Tuesday, December 5, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी केला रस्ता रोको

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना अटक केली. Fight for obc reservation

 

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

 

मात्र काल बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची हृदयगती, रक्तदाब आणि शुगर पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आज ओबीसी समाजाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

 

आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड होते. बैठकीला दिनेश चोखारे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. काही वेळ वाहतूक
खोळंबली होती. मात्र यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेणे सुरू केले.

24 सप्टेंबरला शासन, लोकप्रतिनिधींची प्रेतयात्रा

२४ सप्टेंबरला आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून प्रेतयात्रा काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाईल. त्यानंतर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर ओबीसी कार्यकर्ते ठिय्या देतील. २५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातीस सर्व तालुकास्तरावर लाक्षणिक आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular