News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका आज ही मागास आहे. अनेक समस्यांचे तालुका माहेरघर झाला आहे. अनेक गावात जायला पक्के रस्ते नाही. अश्यात आज जिवती शहरात महाराष्ट्र शासन द्वारे दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
काही बांधवाना वाहनांची अडचण होती. अश्यावेळी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी स्वतःच्या वाहनाने भुरी येसापूर गावला जाऊन तिथल्या दिव्यांग बांधवाला आणि त्याच्या आईला घेऊन कॅम्पमध्ये सहभाग घेतला. त्याचे कागदपत्र घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्याला योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक दिव्यांग बंधूंना कागदपत्र पूर्तता करून त्यांची मदत केली.
तालुक्याच्या समस्येवर वेळोवेळी आंदोलन….
जिवती तालुक्यात अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्याना घेऊन भूषण फुसे यांनी वेळोवेळी आंदोलन केले.जिवती शहरात निघालेल्या बीआरएसच्या मोर्च्यात मोठी गर्दी होती. फुसे यांची सक्रियता बघता राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे.