news34 chandrapur
चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident
दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले आणि त्यामुळे होणाऱ्या धोक्यांची कल्पना नव्हती. दुर्दैवाने, ते पाण्यात आणि गाळात अडकले, त्यामुळे मित्रांचा अकाली मृत्यू झाला. accident prevantion
राजुरा तालुक्यातील सास्ती या गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. chandrapur district
घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. chadda contractor