chandrapur rain चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात परत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 29 जुलैला पुराचे पाणी पुलावरून गेल्यामुळे भोयेगाव – चंद्रपूरमार्ग तिसऱ्यांदा बंद झाला आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात युवकांचा जीवघेणा स्टंट
कोरपना, राजुरा, गोंडपिपरी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होत असून पिकांची वाढ खुंटली आहे व पिके पिवळी पडून खराब होत असल्याचे चित्र आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी भोयेगाव-चंद्रपूर मार्गावर गडचांदूर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.