pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.

pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यांचा अन्याय दुर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम मिळावी यासाठी यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली.

धक्कादायक बातमी : तुझ्या अब्रूचे धिंडवडे उडवीत तुला ठार करणार, अवैध दारू विक्रेत्यांची महिलेला धमकी

डॉ गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रमजी मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर, सुखदेवजी वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेलभरो आंदोलन

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!