Political criticism उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान माजविले आहे, त्यांच्या क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असून महायुतीने राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात टाकलेलं आहे असे चित्र आपल्यापुढे तयार झाले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली, चंद्रपुरात कांग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी वडेट्टीवार प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.
अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 कोटीचं भगदाड
Political criticism वडेट्टीवार पुढे म्हणाले की नागपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मात्र गृहमंत्री फडणवीस यावर दुर्लक्ष करीत आहे, गृहमंत्री फडणवीस राज्यभर दौरे करीत असताना नागपूर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यँत 6 हजार 883 गुन्ह्यांची नोंद झाली, त्यामध्ये खून 165, बलात्कार 268, महिलांवर अत्याचाराचे प्रकरण 300 च्या पुढे आहे, कायदा व सुव्यवस्था यावर गृहमंत्री दुर्लक्ष करीत आहे, ही सर्व आकडेवारी माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.
गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे उडत आहे, तर राज्यात काय अवस्था आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय? राज्यात दररोज 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहे, 15 लोकांची रोज हत्या होत आहे, हे महाराष्ट्र राज्याचं विदारक चित्र आहे. महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त केले असून राज्याला खड्ड्यात टाकलं आहे.