akshaya tritiya marriage
akshaya tritiya marriage : चंद्रपूर – ३0 एप्रिल रोजी अक्षयतृतीया हा सणआहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाहसोहळे तसेच वैयक्तिक विवाह आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम 2022 तयार केले आहेत.
चंद्रपुरात आदर्श ठरला सत्यशोधक विवाह सोहळा
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत 5 वर्षात 68 बालविवाह थांबविण्यात आले असून 9 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सज्ज असून गावात बालविवाह होणार नाही, याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व सुजान नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. child marriage act 2006
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी) हे शहरी भागाकरिता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून, ग्रामसेवक हे ग्रामीण भागाकरिता प्रतिबंधक अधिकारी आहे. त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेत. गावामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समित्या गठित आहे. पोलिस पाटील, आशावर्कर हे त्यासमितीचे सदस्य आहेत व अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तर होऊ शकतो कारावास आणि दंड : बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, भंतेजी, तसेच मंडपवाले, कॅटरिंग, वाजंत्री विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वरवधुचे आई–वडील हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दोन वर्षाचा सश्रम कारावासाच्या शिक्षेस तसेच एक लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र असू शकेल. child marriage punishment in India
बालविवाहा बद्दल माहिती देण्याचे आवाहन : ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रात कुठेही बालविवाह होत असल्यास महिला व बालविभाग अंतर्गत चाईल्डलाईन टोल फ्री क्र.1098 (24तास), जिल्हा बालसंरक्षण कक्ष 7972059274, संस्था क्षेत्रीय अधिकारी 7304583054, असेस टू जस्टीस फॉर चिल्डेन प्रकल्प जिल्हा समन्वयक 9112796463 या क्रमांकावर, जवळचे पोलिस स्टेशन, गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी/ग्रामीण) यांना त्वरीत माहिती द्यावी. report child marriage India
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बालविवाह राखण्याबाबत जागृत राहावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी. यांनी केले आहे.