Bhadravati land survey news
Bhadravati land survey news : भद्रावती – भद्रावती शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना जागेची आखीव पत्रिका तात्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी दिला आहे.
या संदर्भात सौ. आत्राम यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भद्रावती गावठाण क्षेत्रातील जमिनींच्या सिटी सर्व्हे संदर्भात पाठपुरावा सुरू असूनही संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे महत्त्वाचे काम थंड बस्त्यात गेले आहे. परिणामी येथील नागरिकांना शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाहीये. Drone land survey
आपल्या क्षेत्रात अनधिकृत हॉस्टेल आहे का? तक्रार करा
गौराळा वार्डसह शहरातील इतर ९ गावठाण वसाहतींमध्ये अनेक नागरिक गेली १०० वर्षे राहत आहेत. मात्र त्यांच्या जमिनींची व मालमत्तांची कुठलीही अधिकृत नोंद नसल्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनांपासून ते जातीचा दाखला काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेत नागरिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. Drone land survey benefits
केंद्र शासनाच्या ‘स्वामित्व योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये गावठाण मालमत्तांचे ड्रोनद्वारे मोजमाप करण्यात येत आहे. हे मोजमाप अचूक आणि जलद गतीने होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळतो. याद्वारे घरे, रस्ते, नाले, खुल्या जागा आदींचे सीमांकन स्पष्टपणे होणार असून, शासनाच्या ताब्यातील जमिनींचे संरक्षणही शक्य होईल. सर्वेक्षणानंतर मिळकत नकाशा आणि कायदेशीर हक्काचा अभिलेख तयार करून नागरिकांना अधिकृत पत्रिका देण्यात येईल, ज्यामुळे बँक कर्ज मिळविणेही सुलभ होईल.
मात्र, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील जनरल मॅनेजर यांनी या ड्रोन मोजणीला आक्षेप घेतल्याने भद्रावती शहरातील गावठाण मोजणीची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सौ. मिनलताई आत्राम यांनी केली आहे.
“मा. पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून गौराळा आणि इतर गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे करून नागरिकांना जागेची अधिकृत आखीव पत्रिका तात्काळ द्यावी, अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण जागेची मोजणी करण्यासाठी काही अर्ज कराव लागत का ?
कारण आमच्या गावाची सुद्धा गावठाण जागेची मोजणी झालेली नाही
या योजनेपासून अजून पर्यंत कित्येक गावे वंचित आहेत
त्यामुळे लवकरात लवकर सर्व गावातील मोजणी होऊन सर्वांना त्यांच्या मालमत्तेची अधिकृत पत्रिका मिळायला हवी.
कु.अमय पाटील
तालुका वसई
जिल्हा पालघर