Chandrapur tourists stuck in pahalgam
“घरी परतायचंय… पण कर्फ्यूने अडवलं” – पहलगाममध्ये अडकलेल्या चंद्रपूरकरांची व्यथा
Chandrapur tourists stuck in pahalgam : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६ पर्यटकांचा समावेश आहे, राज्यासह चंद्रपूर शहरातील ७ पर्यटक आजही पहलगाम मध्ये अडकले असून सध्या ते दहशतीच्या सावटात असून अजूनही त्यांना प्रशासनातर्फे कसलीही मदत मिळालेली नाही. Pahalgam attack Maharashtra tourists
राज्यातील पर्यटकांना विशेष विमानाने परत आणा – खासदार धानोरकर
देशातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता, या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला, घटनेनंतर पहलगाम मध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. विविध राज्यातील प्रशासन आहे. Pahalgam shooting incident 2025
चंद्रपूर शहरातील ७ नागरिक सध्या पहलगाम मध्ये अडकलेले आहे, यामध्ये तेजस्विनी गाडीवान, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान, अंकित नगराळे, रितेश नळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे यांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी सदर नागरिक काश्मीरच्या मार्गे रवाना झाले होते, तिथे पोहचल्यावर त्यांनी आधी वैष्णोदेवीचे दर्शन केले. त्यानंतर काश्मीर मधील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते पहलगाम मध्ये पोहचले. पहलगाम मधील शबाना पॅलेस मध्ये गेले, २२ एप्रिल रोजी ज्याठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथे चंद्रपुरातील नागरिक फिरायला गेले होते, यावेळी त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला. Pahalgam attack Maharashtra tourists
काय घडलं?
आम्ही सर्व हॉर्स रायडींग करीत असताना अचानकपणे लोक सैरावैरा पळू लागले, तितक्यात गोळीबाराचा आवाज आला, आम्ही तात्काळ कार पार्किंगकडे धाव घेतली, त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली कि हा दहशतवादी हल्ला होता. आम्ही तात्काळ हॉटेलकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन न मिळाल्याने आम्ही सर्व ५ किलोमीटर पायदळ चालून हॉटेलमध्ये पोहचलो. त्याचदिवशी आम्हाला या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. आम्ही सर्व घाबरून आहो. याबाबत आम्ही चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी प्रशासनाला याबाबत कळविले आहे.
चंद्रपुरातील प्रशासनाने आमच्याशी संपर्क साधला असून अद्यापही आम्हाला काही मदत मिळाली नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. २३ एप्रिलला त्यांच्या परतीची ट्रेन होती मात्र पहलगाम मध्ये सध्या कर्फ्यू लागल्याने आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत.
याबाबत न्यूज ३४ तर्फे प्रशासनाला चंद्रपुरातील पर्यटकांच्या परतीबाबत विचारणा करण्यासंदर्भात संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. चंद्रपुरातील नागरिक दहशतीखाली असून प्रशासनाने तात्काळ त्यांना पहलगाम मधून सुखरूप बाहेर काढत चंद्रपुरात परत येण्यासंदर्भात लवकर प्रयत्न करावे अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.