चंद्रपूर शहर बनले समस्यांचे माहेरघर

News 34

चंद्रपूर शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे,शहरात ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून नागरिकांना पायदळ किंवा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.

रस्त्यावरील खड्ड्या मुळे दररोज अपघात सुद्धा होत आहेत, त्याचप्रमाणे आता पावसाळा सुरू आहे आणि थोडा जरी पाऊस आला तर शहरात नदीचे रूप बघायला मिळते त्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरते.

Pub-G च्या नादात मुलाने केली आई-वडिलांची हत्या

नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, बाबूपेठ प्रभाग तर समस्यांचे माहेरघर आहेत,बाबूपेठ गेट ते फुले चौकापर्यंत खडेच खड्डे आहेत, नालीवर झाकण नसल्यामुळे सर्वत्र घाण रस्त्यावर येतात,अमृत योजनेतून रस्ता फोडल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

या सर्व समस्याला वाचा फोडण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे नेतृत्वात तसेच उपस्थितीत उपायुक्त महानगर पालिका चंद्रपूर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी उपायुक्त यांनी आयुक्त साहेब नसल्यामुळे मी आपण निवेदनात दिलेल्या सर्व समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो आणि नक्कीच मार्गी लावतो असे शिस्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्ट मंडळाणी उपायुक्त याना जर या समस्या वेळेत सुटल्या नाही तर काँग्रेस पक्षातर्फे महानगर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा दिला.

यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश पदाधिकारी अश्विनीताई खोब्रागडे,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी माजी नगरसेविका विनाताई खनके,सकिनाताई अन्सारी,वंदनाताई भागवत ,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष निशाताई ढोंगळे अल्पसंख्याक विभागाच्या महिला पदाधिकारी मुन्नीताई शेख ,महिला काँग्रेस च्या जयश्री जाधव ,सुवर्णा भारस्कर,अंजु वैरागडे ,लीला बुटले,तेजस्विनी पोडे, शीतल लेडांगे,यांचे सह महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!