Congress claims bogus voters increase
Congress claims bogus voters increase : चंद्रपूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी भाषणात माजी आमदार सुभाष धोटे यांनी धक्कादायक आरोप करताना सांगितले की, “माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल 20 हजार बोगस मते वाढविण्यात आली. तक्रारी नंतर त्यापैकी 6 हजार 700 बोगस मतदार वगळले गेले असले तरी शिल्लक मते कायम राहिली. यातूनच भाजपचा उमेदवार केवळ 3 हजार मतांनी निवडून आला. यावरून निवडणूक आयोग बदमाश असल्याचे स्पष्ट होते,” असा दावा त्यांनी केला.
नदीत फुटबॉल चा खेळ, दोघांचा मृत्यू
५० हजार बोगस मतदार
धोटे पुढे म्हणाले की, “माझ्याकडे ऑनलाइन नोंदणीद्वारे ही बोगस मते वाढविण्यात आल्याची माहिती आली असून याबाबत मी राजुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फक्त राजुरा मतदार संघातच नाही तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 50 हजार बोगस मते वाढविण्यात आली आहेत. राहुल गांधी जे सांगत आहेत ते सत्य आहे,” असेही ते म्हणाले. fraudulent voters accusation

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सज्ज असून “प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन बोगस मते ओळखून त्यांना वगळण्याचे काम काँग्रेस करणार,” असा निर्धार धोटे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला
