why roads are so bad in Chandrapur
why roads are so bad in Chandrapur : चंद्रपूर – खनिज संपत्ती ने नटलेला चंद्रपूर, राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री, सह अनेक मंत्री दिले मात्र आजही हा जिल्हा उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा जिल्ह्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक अभियांत्रिकी कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.
मुलींनी मंगळसूत्र विकलं, मात्र तरी झाली फसवणूक, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार
शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे. pothole problems in Chandrapur city
हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब….
बागला चौक आताचा शहीद हेमंत करकरे चौक ते लालपेठ कडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प ते बस स्थानक, बंगाली कॅम्प ते जुनोना चौक, जटपुरा गेट ते गिरनार चौक या मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.
शहरात अमृत योजनेच्या कामामुळे अनेक मार्ग बेजार झाले, अनेक मार्गावर मोठे खड्डे पडले, काही सामाजिक संघटनांनी यावर आंदोलन केले, त्यांनतर प्रशासनाने अखेर रस्ते बनवायला सुरुवात केली, रस्ते बनवून महिना उलटल्यावर पाऊस पडला आणि नवनिर्मित रस्त्यावरील विकास हा खड्ड्याच्या स्वरूपात बाहेर पडला. why newly constructed roads break in rain
यावर विशेष बाब म्हणजे इंजिनिअर यांना काम वाटपात दुजाभाव केल्या जातो यावरून सार्वजनिक बांधकाम विभागात हाणामारी चा प्रकार सुद्धा घडला होता, याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही देण्यात आल्या होत्या. म्हणजे इंजिनिअर हे कामासाठी भांडतात, त्यांना काम मिळण्यात दुजाभाव होतो, आणि काम मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करीत ते बाजूला होतात.
जनतेमध्ये हिंमत कधी येणार?
चंद्रपुरातील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र चंद्रपुरातील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.

म्हणून म्हणतात ना ५०० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे…अशी अवस्था आपली झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडते, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक फरक पडत नाही.
