Chandrapur political situation । आता रंगत येणार! चंद्रपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur political situation

Chandrapur political situation : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने एकाच पक्षाचे झालेले २ भाग या निवडणुकीत रंगत आणणार आहे. मागील ३ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व नगरपालिका मध्ये प्रशासक बसल्याने निवडणूका आरक्षण मुळे लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Political parties Chandrapur municipal corporation election

चंद्रपूर ॲक्शन मोडमध्ये! शालेय वाहतुकीतील धोके टाळण्यासाठी कडक उपाययोजना!

चंद्रपूर जिल्ह्यात १ महानगरपालिका, जिल्हा परिषद, ८ नगरपालिका व १५ पंचायत समित्या आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षीय बलाबल मध्ये भाजपची आघाडी होती, १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेत भाजप ३६, कांग्रेस १२, राष्ट्रवादी कांग्रेस २, शिवसेना २ , बसपा ८, मनसे २ व अपक्ष ४ अशी सदस्यसंख्या होती. राज्यातील राजकीय उलथापूलथीमध्ये नगरसेवक विविध पक्षात दाखल झाले आहे. Chandrapur district council election political analysis

चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा ५६, पक्षीय बलाबल भाजप ३३, कांग्रेस २० इतर ३.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण नगरपालिका ८ आहे ज्यामध्ये बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर,मूल,ब्रह्मपुरी व नव्याने घुग्गुस नगरपालिकेचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५ भाजप तर १ जागेवर कांग्रेसचे विजय झाला असून भाजपसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. चंद्रपूर महानगरात नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे चंद्रपुरात निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे आहे.

राजकीय स्थिती

चंद्रपूर शहरात भाजपची सध्याची परिस्थिती बिकट अवस्थेत आहे, भाजपच्या २ आमदारांमध्ये विधानसभा क्षेत्रावरून कोल्ड वार सुरु आहे, मात्र आमदार किशोर जोरगेवार भाजपची नैया पार लावणार अशी चित्रे आहे. चंद्रपुरात अमृत व भूमिगत गटार योजनेच्या खोदकामावरून नागरिक प्रचंड नाराज आहे. रस्ते बनल्यावर वारंवार ते खोदल्या जात असून वाहतुकीची समस्या बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यामुळे धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस चे विभाजन झाल्यावर पाहल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने येणार, विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षाची परिस्थिती जिल्ह्यात पूर्णतः मजबूत नाही..परिस्थिती जैसे थे आहे.

Leave a Comment

+