News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठे उद्योग अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र हे सर्व उद्योग कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे, गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांनी 6 ऑक्टोबर ला सकाळपासून विरुगुरी आंदोलन सुरू केले आहे.
3 कामगार गगनचुंबी टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे, अंबुजा सिमेंट कंपनी अडाणी समूहाकडे गेल्याने त्यांनी भूसंपादन कायद्याचे उल्लंघन केले, ही सर्व बाब 4 वर्षांपूर्वी चौकशीत सिद्ध झाली मात्र त्यावर काही कारवाई केल्या गेली नाही.
4 वर्षापूर्वी शासनाने कंपनीला कारवाईची नोटीस सुद्धा पाठवली मात्र कारवाई फक्त कागदोपत्री मर्यादित राहिली, सरकार सर्व नियम धाब्यावर बसवून अंबुजा सिमेंट कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, भूसंपादन करार रद्द करीत प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकरी च्या मागणीसाठी सकाळपासून प्रकल्पग्रस्तांनी टॉवर वर चढत विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे.
अंबुजा गो बॅक, अडाणी गो बॅक ची नारेबाजी कामगार करीत असून आम्हांला न्याय द्या अन्यथा आम्ही जीवाचे बरेवाईट करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.