News34 chandrapur
बल्लारपूर (रमेश निषाद)
बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी चॉकलेट घेण्यासाठी दुचाकी मोपेडवरून घरातून निघाली होती.
बामणीहून राजुरा येथे जात असताना , दुचाकीचा तोल गेल्याने वाहन वर्धा नदीच्या पुलावरून खाली पडले. या घटनेत गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या मुुुलाचा जीव वाचला.. निरागस बाळ रात्रभर आईच्या मृतदेहा शेजारी रडत राहिले.
आज पहाटे पाच वाजता पुला खालून मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबीयांना ऐकू आल्याने त्यांनी खाली जाऊन पाहिले असता सुषमाचा मृतदेह शेजारी लहान बाळ रडत असताना आढळले. त्या चार वर्षाच्या मुलालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
बालकावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी सुषमा काकडे यांना मृत घोषित केले.
महिलेने आत्महत्या केली की काही घात झाला याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत. महिलेचा पती हा कर्मचारी पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत आहे.