Marathi news
मुंबई – श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजप तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे.
16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबविले, यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानुसार आपण आपली श्रद्धास्थान स्वच्छ करायला हवे, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्वी राज्यातील सर्व मंदिरे स्वच्छ असावी.
सध्या राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे, ज्यांनी राम मंदिर व्हावं यासाठी आंदोलन केले त्यांच्यासाठी 22 जानेवारी हा दिवस दिवाळी सारखा सण आहे, मात्र ज्यांनी आंदोलनात साधा सहभाग सुद्धा घेतला नाही ते वारंवार टीका करीत आहे, माझं एकचं सांगणे आहे की उबाठा सेने ने हिंदुचा अपमान करणे थांबवावे.