Chandrapur water crisis । चंद्रपूरमध्ये पाणीबाणी: बाबूपेठमधील नागरिक त्रस्त!

Chandrapur water crisis

Chandrapur water crisis : चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ प्रभागात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नळाला अत्यंत कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. Municipal water issues

निलेश बेलखेडे यांच्या मागणीला यश, गोंडवाना विद्यापीठात शिवरायांचा पुतळा

  • पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल:
  • नळाला कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी येत आहे.
  • उन्हाळ्यामुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
  • पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे.
  • भाजपा कार्यकर्त्यांची मागणी:
  • पाणीपुरवठा वाढवण्यासाठी किंवा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
  • नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन केली. याप्रसंगी अभिलाष दुबे, प्रफुल्ल डफ, अभिनेश इम्मडी, विनोद नले, राहुल शुक्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment