breaking Tiger Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून शनिवारी १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने शिकार केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४४ नागरिक ठार झाले असून यामध्ये वाघाच्या हल्ल्यात ४०, बिबटच्या हल्ल्यात २ आणि अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. (हे हि वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)
शेतात काम करताना झाला हल्ला
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात राहणाऱ्या ४९ वर्षीय अरुणा उर्फ छाया अरुण राऊत हि महिला शेतात कामाला गेली होती, सायंकाळ झाल्यावर अरुणा घरी परतली नाही, महिलेचे पती अरुण घरी आले असता त्यांनी पत्नीची गावात इतरत्र चौकशी केली मात्र त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर गावातील नागरिकांना एकत्र करीत शेतात गेले असता त्याठिकाणी सुद्धा अरुणा मिळाली नाही. लगतच्या जंगल परिसरात गावकर्यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावरील नाल्याजवळ अरुणा चा मृतदेह आढळून आला.
मृतक अरुणाच्या गळ्याला व दोन्ही पायांना आणि पाठीला गंभीर जखमा होत्या. तसेच त्यांचे दोन्ही हात पूर्णतः तुटलेले होते. यावरून वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. breaking Tiger Attack
दुसऱ्या घटनेत १३ डिसेंबर ला मूल तालुक्यातील वन संरक्षित क्षेत्रात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राख्याचे नाव पीतांबर गुलाबराव सोयाम,वय 36,रा.बेलघाटा असे आहे. पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमंेट नंबर 1765 मध्ये गुर चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.मात्र, सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगलालगतच्या शेतात पीतांबरचा मृतदेह आढळून आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात कामावर जायचं कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.










