जिवती: Jivati Tribal Road Construction उपक्रमातून आदिवासी समाजाने एकजुटीची ताकद दाखवली. घोडणकप्पी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले.
दोन महिन्यांपूर्वी जिवती तालुक्यात रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. (हे हि वाचा – २ ऑक्टोबरपासून चंद्रपुरात अग्नीवर भरती)
अखेर प्रशासनाच्या प्रतीक्षेत न राहता गोंदोलो सामुका यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुकर करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी हे कार्य पूर्ण केले.
मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष
दुर्गम आणि आदिवासी भागात आजही रस्ते, आरोग्य सेवा आणि वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागण्या आणि निवेदने देऊनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले.
“प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळतात, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी आम्ही स्वतःच रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला,” असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
एकजुटीतून दाखवली सामाजिक बांधिलकी
आदिवासी बांधवांनी एकत्र येत घेतलेल्या या पुढाकारामुळे दुर्गम भागातील वाहतूक काही प्रमाणात सुकर होण्यास मदत होणार आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही नागरिकांना मूलभूत हक्कांसाठी आणि सुविधांसाठी स्वतःच कुदळ-फावडे हाती घ्यावे लागत असल्याने, प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






