Saturday, September 23, 2023
HomeNewsराखी बांधायची कधी? जाणून घ्या योग्य वेळ

राखी बांधायची कधी? जाणून घ्या योग्य वेळ

मुहूर्तावर संभ्रम

- Advertisement -
- Advertisement -

News34 raksha bandhan

चंद्रपूर – आज दिनदर्शिकेत नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन नमूद आहे मात्र राखी कधी बांधायची हा पेच मुहूर्तामुळे अडकल्याने राखी बांधायची की नाही? हा प्रश्न बहिणीसमोर पडला आहे.

यंदा 30 व 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे, पौर्णिमा तिथी ही दोन दिवस असल्याने 30 ऑगस्ट पासून सकाळी 11 तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला सकाळी 7.37 पर्यंत असल्याने राखी बांधण्याचे 2 मुहूर्त असणार आहे.

राखी कधी बांधायची?

 

30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग देखील आहे, जो खूप खास मानला जातो. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते आणि 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता पौर्णिमा संपते, त्यामुळे या दरम्यानचा वेळ हा राखी बांधण्यासाठी योग्य आहे.

परंतु 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजेपर्यंत भद्राकाळ असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरं केलं जावू शकतं. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 मिनिटांपर्यंत भावाला राखी बांधता येईल. पण बरेच जण मानतात की, बहिणीचं भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो, त्यामुळे अशा दिवशी मुहूर्ताचा सोस कशाला बाळगायचा. त्यामुळे जे लोक मुहूर्ताची परवा बाळगत नाही, ते 30 ऑगस्टला कोणत्याही वेळी भावाला राखी बांधू शकतात.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..