चंद्रपुरात निघाला ओबीसींचा महामोर्चा

News 34 chandrapur

चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

 

याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये,बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे, ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही. सोमवार पासून 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

 

अन्नत्याग आंदोलनाला शासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही, मात्र मराठ्यांच्या आंदोलनात राज्याच्या अर्ध्या मंत्री मंडळाने भेट दिली, पण ओबीसी आंदोलनाला अजूनही एकाही मंत्र्याने भेट दिली नाही.

 

सोमवारी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महामोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग दर्शविला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपला सहभाग दर्शविला.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलन मंडपात मोर्चा समाप्त करण्यात आला, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नाही, सरकारने ओबीसी वस्तीगृहाबाबत घोषणा केली मात्र त्याची पूर्तता केली नाही, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

आयोजित महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील हजारो ओबीसी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!