News34
चंद्रपुर – जिल्हातील राजुरा ,पोंभुर्णा ,मुल ,चंद्रपुर या तालुक्यातील गोलकर समाजातील ईयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थांच्या गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपुर येथील व्यवस्थापनाने शासकिय अनुदान मिळणार असल्याचे सांगुण मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र T.C. गोळा केल्या आणि आपल्या शाळेत प्रवेश दिला.
मात्र दोन महिण्यानंतर प्रत्येक पालकांना फोन करुन ,कोणतीही पुर्वकल्पना न देता ,आता शासनाकडुन कोणतेही अनुदान मिळणार नसल्याचे कारण सांगुन TC घेऊन जाण्यास सांगीतले. हे सर्व नियमबाह्य असुन RTE नुसार 25 जागा एस.सी./एस.टि./एन.टि. करीता राखीव ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे.त्या निर्देशाचा भंग करुन मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन पालकांची पिळवणूक करीत आहे.
तेव्हा या 25 विद्यार्थांचे शैक्षणिक भवितव्य वाया जाऊ नये म्हणुन गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपुर चे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन यांच्यावर ऊचीत कार्यवाही करुन विद्यार्थांना न्याय द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर जिल्हाध्यक्ष विलास खोंड ,जिल्हाकार्यवाह दिलीप मॕकलवार ,शहर कार्यवाह वसंत वडस्कर ,काॕन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर ,नागपुर विभाग ऊपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार , झोडे सर यांनी सदर मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहे.
तसेच या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षण ऊपसंचालक नागपुर आणि नागो गाणार माजी शिक्षक आमदार यांना दिले आहे.