Criminal Detention under MPDA : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या २७ वर्षीय करीम फिरोज सय्यद याला महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. Chandrapur Police Action
ओबीसी समाजाच्या समस्येवर सरकारने लक्ष द्यावे - खासदार प्रतिभा धानोरकर
करीम फिरोज सय्यद हा दुर्गापूर भागात सतत गंभीर गुन्हे करत होता आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविला. पुढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.
जिल्हाधिकारी यांनी MPDA अंतर्गत प्रस्तावास मान्यता देऊन करीम फिरोज सय्यद याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशाची प्रत दुर्गापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले व त्याला चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. MPDA Act Maharashtra
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अरुण खारकर आणि गुन्हे शोध पथकाने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे वर्ष २०२४ मध्ये व वर्ष २०२५ च्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
MPDA कायद्यांतर्गत आरोपीला काही काळासाठी स्थानबद्ध करता येते, ज्यामुळे तो समाजात पुन्हा गुन्हे करू शकत नाही. यामुळे पोलिसांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर पावले उचलण्याची संधी मिळते आणि नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव येतो.
चंद्रपूर पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात अशाच प्रकारे कठोर कारवाई करून पोलिसांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a Comment