farmers burning soyabean after rain : कोरपना ३ नोव्हेम्बर (News३४): आधीच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असताना, अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे आणि मोठे संकट उभे केले आहे. कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्याने याच संकटापुढे हतबल होऊन 6 एकर क्षेत्रावरील कापणी केलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अखेर आग लावून जाळून टाकले. या हृदयद्रावक घटनेमुळे मसे यांचे केवळ पीकच नव्हे, तर सुमारे 25 हजार रुपयांचा कापणी खर्च देखील पाण्यात गेला असून, ते आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
सततच्या पावसामुळे पीक काढता येत नाही आणि ढिगाऱ्यातच ते कुजत चालले आहे, हे पाहून शेतकरी प्रशांत मसे पूर्णपणे हतबल झाले. लाखोंचे नुकसान डोळ्यांदेखत होताना पाहून त्यांनी जड अंतःकरणाने आपल्या 6 एकर क्षेत्रावरील जमा झालेल्या सोयाबीनच्या संपूर्ण ढिगाऱ्याला आग लावून दिली. soyabean crop loss due to unseasonal rain
या घटनेमुळे मसे यांचे संपूर्ण 6 एकरावरील उत्पादन नष्ट झाले असून, ते पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा आहे.
Leave a Comment