Prabhat Rally : देशात सतत वातावरणात होत असलेला बदल हा भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतो, या बदलाने पर्यावरण व मानवी जीवनास हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, करिता यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अपघात कमी करायचे असतील तर...पडोली चौकात
वातावरणात होत असलेला बदल ग्लोबल वॉर्मिंग यावर उपाययोजना व चर्चा करण्यासाठी चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज चे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.
16 जानेवारीला या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे, तत्पूर्वी शहरात सकाळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पर्यावरण प्रभात रॅली ची सुरुवात करण्यात आली. आयोजित रॅली मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्व बाबत आकर्षक देखावे सादर केले.
पर्यावरणाला वाचविण्यासाठी आम्ही मोठी चळवळ उभी करीत आहे, ही चळवळ आता थांबणार नाही असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Leave a Comment