चंद्रपूर ‘अयोध्यामय’ होणार! चंद्रपूरमध्ये रामकथेचा महोत्सव

January 17, 2026 by Prakash Hande

Ram Katha Chandrapur : चंद्रपूर 8 जानेवारी : चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. लखमापूर हनुमान मंदिराच्या तत्वावधानाखाली व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने आयोजित, १४ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘लखमापूर धाम’ (चांदा क्लब ग्राउंड) येथे होणारी श्रीराम कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, संस्कारांच्या पुनर्जागरणाचा एक महोत्सव ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, जगप्रसिद्ध मानस मर्मज्ञ परम पूज्य राजन जी महाराज आपल्या अमृतमय वाणीने प्रभू श्रीरामांच्या पावन लीलांचे रसपान घडविणार आहेत. (चंद्रपुरातील १६ हजार कुटुंबाना मिळणार घरपट्टे)

पूज्य राजन जी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा व विद्वत्तेचा अद्भुत संगम आहे. त्यांच्या जीवनातील काही विशेष बाबी या कथेला अधिकच महत्त्वपूर्ण बनवतात. पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे जन्मलेले व उत्तर प्रदेशातील बलिया येथील संस्कारांनी घडलेले महाराज जी यांनी बालपणापासूनच रामायण व अध्यात्माला आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. शास्त्रीय गायनाचे शिक्षण व रामचरितमानसावरील अपार प्रेमामुळे ते एक अद्वितीय कथावाचक म्हणून ओळखले जातात.

महाराज जी यांनी भारतातील प्रत्येक राज्यातच नव्हे, तर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा तसेच आखाती देशांमध्येही श्रीराम कथेचा गंगाप्रवाह वाहिला आहे. युट्यूब व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रवचनांना कोट्यवधी वेळा पाहिले गेले असून, त्यामुळे युवक सनातन संस्कृतीशी जोडले जात आहेत.

पूज्यनीय श्री राजन जी महाराज यांच्या स्वरात साकारलेली शेकडो भजने—जसे की ‘राम की भक्ति में’—आणि रामचरितमानसाच्या चौपायांचे गायन थेट हृदयाला स्पर्श करते. त्यांच्या गीतांनी संगीताला साधनेचे रूप दिले आहे.
महाराज जी यांच्या कथेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे ते कथेला वर्तमान जीवनातील समस्यांशी जोडतात. त्यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत लाखो लोकांनी मांसाहार, नशा व इतर कुप्रथांचा त्याग करून ‘राम-पथ’ स्वीकारला आहे.


कथेपूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून एक भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत सुमारे ७,००० हून अधिक भक्त सहभागी होतील, ज्यामध्ये ५०० मातृशक्ती पारंपरिक वेशभूषेत कलश धारण करून सहभागी होणार आहेत. हजारो युवकांची टोळी, भजन मंडळ्या आणि भव्य झांक्यांमुळे चंद्रपूरच्या रस्त्यांना ‘अयोध्यामय’ स्वरूप प्राप्त होईल.
महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांच्या संरक्षणाखाली, तसेच श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष श्री हरीशजी भट्टड व समिती सदस्यांच्या सहकार्याने हा भव्य आयोजन करण्यात येत आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांच्या प्रेरणेमुळे या कार्यक्रमाला अत्यंत भव्य व सुबक स्वरूप देण्यात आले आहे, जेणेकरून दूरदूरून येणाऱ्या भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये. Ram Katha Chandrapur

१०,००० हून अधिक श्रद्धाळूंना बसण्याची व्यवस्था

लखमापूर धाम (चांदा क्लब ग्राउंड) येथे १०,००० हून अधिक श्रद्धाळूंना बसण्याची व्यवस्था असलेला वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुलभ प्रवेश-निर्गमन व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराज जी यांची कथा आधुनिक तर्कशक्ती व प्राचीन ज्ञानाचा सुंदर संगम असून, दिशाहीन होत चाललेल्या युवक पिढीला योग्य दिशा देणारी आहे.

समितीचे उद्दिष्ट ‘जात-पात विचारू नये कोणी’ या भावनेतून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचे आहे. कथेच्या दरम्यान महाराज जी नशाविरोधात विशेष आवाहन करणार असून, त्यामुळे चंद्रपूरमधील अनेक कुटुंबांमध्ये सुख-समृद्धी येण्याची अपेक्षा आहे.
शोभायात्रा व कथा स्थळी स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा विशेष संदेश देण्यात येणार आहे. श्री लखमापूर हनुमान मंदिराचे श्रीराम कथा सेवा समितीचे संरक्षक, श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत आवाहन करताना सांगितले :

“हा प्रसंग केवळ कथा ऐकण्याचा नसून, आपल्या अंतःकरणातील राम जागवण्याचा आहे. चंद्रपूरचे हे सौभाग्य आहे की पूज्य राजन जी महाराज आपल्या नगरात पधारत आहेत. १४ ते २२ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रभूंच्या चरणी आपल्या जीवनातील काही क्षण अर्पण करावेत, असे आवाहन आम्ही समस्त सनातनी समाज, आध्यात्मिक संस्था व युवकांना करतो.”
या पत्रकार परिषदेस श्रीराम कथा सेवा समितीचे प्रमुख पदाधिकारी श्री हरीश भट्टड, श्री दिनेश नाथवानी, चंदनसिंह चंदेल,श्री उमाशंकर सिंह, श्री आनंद झा, श्री विजय शुक्ला,डॉ. मंगेश गुलवाडे, श्री प्रकाश धारणे, डॉ. शैलेन्द्र शुक्ल, श्री काशीनाथ सिंह, श्री पिंटू जी तसेच श्रीमती मीना ताई देशकर हे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment

+