News34 accident
भंडारा / जावई व मुलीला भेटायला गेले परत येताना दाम्पत्य यांना वाटेत नातेवाईक भेटले ते रस्त्याच्या कडेला थांबले व त्यांच्यासोबत बोलू लागले मात्र त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने दोघांना चिरडले या भयावह अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले.
55 वर्षीय बालचंद ठोंबरे व 52 वर्षीय अनिता ठोंबरे राहणार सोनोली तालुका मोहाडी असे मृतकाचे नाव आहे, ठोंबरे दाम्पत्य हे स्टेशन टोली देवाडी येथे मुक्कामी राहत होते.
रविवार 27 ऑगस्टला भंडारा-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली, घटनेनंतर नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केले, नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने परिस्थिती चांगलीच बिघडली होती.
मुलगी व जावयाची भेट घेऊन ठोंबरे दाम्पत्य घराकडे निघाले होते मात्र खरबी जवळ नातेवाईकांसोबत ते बोलण्यासाठी थांबले असा त्याचवेळी टिप्परने ठोंबरे दाम्पत्याला चिरडले, परिस्थिती हाताबाहेर गेली असता आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांनी नागरिकांची समजूत काढली.
तब्बल दीड तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली, मृतक बालचंद ठोंबरे हे रेल्वेत कार्यरत होते, घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहे.