News34 chandrapur गुरू गुरनुले
चंद्रपूर/मूल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेती नष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक असूनही तांदूळ विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात्व चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे तथा सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनात २३/१०/२०२३ रोज सोंमवारला भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
तरी तालुक्यातील सर्व जंगल लगत शेतकरी- शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक वननिवाशी शेतकरी,नजुल जमीन पट्टेधारक, बेरोजगार युवक युवती तसेच राज्य सरकार व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होणार्या अन्यायाविरुद्ध समस्त मुल तालुक्यातील नागरिकांनी सदर मोर्चात सहभागी व्हावे. असे आव्हान तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने केले आहे.
प्रमुख मागण्या
🔸वाघाने व इतर हिंस्र प्राण्यांनी ठार केल्यास ५० लाख रुपये देण्यात यावे.
🔸शेतीची नुकसान करणार्या रानटी डुकरांचा बंदोबस्त करावा तसेच मारण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
🔸 प्राण्यांपासून शेतीची नुकसान झाल्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
🔸 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवाशी जबरान जोत शेतकरी यांना पट्टे देण्यात यावे.
🔸नजुलच्या जागेवर घरे बांधलेल्या कुटुंबाला स्थायी पट्टे देण्यात यावे.
🔸जंगलालगत असलेल्या शेतीभोवताल तारेचे कुंपण करण्यात यावे.
🔸वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्थायी नौकरी देण्यात यावी.
या सर्व मुलभूत मागण्यांना घेऊन दिनांक २३/१०/२०२३ रोज सोमवारला सकाळी ११.०० वाजता कॄषि उत्पन्न बाजार समिती मुल या आवारापासून ते उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय मुल यांचे कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे करावे असे कांग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.