मराठा आरक्षण हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – गृहमंत्री फडणवीस यांचा आदेश

News34 chandrapur

मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

 

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, 2 हेक्टर च्या निकष काढत आता 3 हेक्टर करण्यात आला आहे.

 

मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे, मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षणबाबत योग्य पाऊल उचलत आहे, मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे, ते अत्यंत चुकीचे असून सरकार हिंसाचार सहन करणार नाही.

कुटुंब घरी असताना घराची जाळपोळ करणे म्हणजे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आहे, याबाबत आता अशी हिंसा करणाऱ्या विरुद्ध कलम 307 अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या हिंसाचाराचा काही राजकीय पुढारी वयक्तिक लाभ घेत आल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे, त्याबाबत पोलीस विभाग आपलं काम करीत आहे, आता हिंसा करणाऱ्या विरोधात पोलीस विभाग कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!