ओबीसी आंदोलनातील नायकाचे जंगी स्वागत

News34 chandrapur

चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दरम्यान तब्बल 20 दिवस रवींद्र टोंगे यांनी ओबीसींच्या मागण्यांकरिता केलेला अन्नत्याग, ओबीसींच्या भावी पिढी करता सातत्याने लढत राहण्याची तयारी अन्नत्याग आंदोलनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लढण्याची एक नवी जिद्द देत होती.

 

रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देऊन सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोंगे यांना ‘आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सलग 20 दिवस उपोषण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. तुम्ही समाजासाठी महत्त्वाचे आहात. तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. तुम्ही रुग्णालयात उपचार करा’ असा सल्ला दिलानंतर ते चंद्रपूरातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने आज 2ऑक्टोबर ला त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आल्यानंतर चंद्रपूर लगतच असलेल्या त्यांच्या मूळ गावी वेंडली येथे रवाना केले.

 

वेंडली या ओबीसी बहुल गावातील एका तरुणाने ओबीसींच्या न्यायिक मागण्यांकरिता तब्बल वीस दिवस अन्नत्याग उपोषण केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक हा गर्वाणवीत झाला होता झाला होता. आज 22 दिवसानंतर रवींद्र गावात आल्याने कुटुंबीय व नागरिकांनीं त्याचे जल्लोषात स्वागत करत त्याचे कौतुक केले.

 

11 सप्टेंबर 2023 पासून रवींद्र टोंगे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात निघाला ओबीसींनीं महामोर्चा काढून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले होते.18 सप्टेंबर आंदोलनस्थळी भेट देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनंती केली मात्र सरकार सोबत चर्चेचे कोणतेही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने टोंगे यांनी आंदोलन सूरू ठेवण्याचा निर्धार पालकमंमंत्र्यांना सांगितला. त्यानंतर 19 सप्टेंबर ला टोंगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केली शासन निर्णयाची होळी केली.

 

20 सप्टेंबर ला ओबीसी विद्याथ्यांच्या न्याय मागण्यासाठी ‘भीक मांगो’सत्याग्रह करण्यात आला.मात्र 22 सप्टेंबर ला रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविन्यात आल्यावरही त्यांनी रुग्णालयात सुद्धा अन्नत्याग करत उपोषण सुरूच ठेवले.

 

पुढे 23 सप्टेंबर ला चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम, उपोषणस्थळी विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यावर 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. याची परिनीती पुढे जिल्हाभर 25 सप्टेंबर ला ओबीसी समाजातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण करण्यात आले. 26सप्टेंबर रोजी विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर यांनी उपोषण स्थळाला भेट देत ओबीसी मागण्या जाणून घेतल्या.

 

28 सप्टेंबर ला राज्य ओबीसी शिष्टमंडळाची सरकारशी सकारात्मक झाल्यावर चर्चा आंदोलन मागे घेण्याचे महासंघाने दिले स्पष्ट संकेत, चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित करण्यात येऊन 30 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी जाहीर केले.

कोण आहेत रवींद्र टोंगे?

रवींद्र यांचा आधार नोंदणी ऑपरेटर ते आंदोलक असा प्रवास झाला आहे. रवींद्र हे चंद्रपूर तालुक्यातील वेंडली या गावातील आहे. रवींद्रकडे सहा एकर शेतजमीन आहे. त्यांच्या घरी पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाची एम.कॉमची पदवी घेतली. ‘टॅली’ चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आधार नोंदणी चालक म्हणून दोन वर्षे काम केले. खासगी कंपनीच्या माध्यमातून लेखापाल विभागात काम केले.

 

ग्रामपंचायतीत माहिती प्रवेश चालक म्हणूनही काम केले. 35 वर्षीय या युवकाला पुढे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसायात जायचे आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही अशी भावना त्यांच्या अंगी होती. त्यातूनच ते ओबीसी महासंघाशी जुळले. त्या कार्याने वरिष्ठ प्रभावित होऊन मागील आठ वर्षांपासून ते ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!