शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – आजच्या प्रगतशील यांत्रिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली व पुढेही होत राहील.परंतु मानवाचा अन्नदाता, पालनकर्ता असणारा शेतकरी अनेक वर्षापासून धडपडतो याच कारण आणूनही कृषी क्षेत्राची प्रगती झाली नाही. पूर्वीपेक्षा शेती तोट्यात चालली आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. यासाठीच नॅनो टेक्नॉलॉजी एक अभिनव प्रयोग विवा मार्ट इंडिया प्रायव्हेट ली. च्या माध्यमातून विकसित केला असून विषमुक्त शेती – रोगमुक्त भारत ही संकल्पना शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल व शेतीचे सोबतच मानवाचे आरोग्य दीर्घकाळ टिकेल.

 

यासाठी आपल्या मुल नगरात प्रथमच किसान सेंद्रिय शेती दुकान खास शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आला असून विषमुक्त जीवन,रोगमुक्त जीवन जगायचे असेल तर रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती करावे विष मुक्त शेती,रोग मुक्त भारत करावे असे अमूल्य मार्गदर्शन व्हिवा मार्ट शेती माहिती तंत्रज्ञ संजय येगारे परभणी यांनी केले.

 

मुल येथील प्रगतशील अनुभवी उत्कृष्ठ शेतकरी श्री.भगवान ढोरे यांनी सर्वात प्रथम मुल येथे ताडाळा रोड येथे किसान सेंद्रिय शेती दुकान सुरु केले असून याचे उद्घघाटन मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गुरु गुरनूले यांचे शुभहस्ते करण्यात आले. उद्घघाटन प्रसंगी पूर्वीच्या पालेभाज्या ,भाजीपाला आणि धान्य शेणखताच्या आधारावर पौष्टिक ताकदपूर्न होते परंतु आता अनेक रोगांना निमंत्रण देणारे धान्य व भाजीपाला खात आहोत.म्हणून आपले आयुष्य कमी झाले. करीता यापुढे रासायनिक खतांचा वापर न करता १०० टक्के ऑर्गनिक असलेला प्रोडक्ट वीवा किसान डेव्हलपरचा वापर करा असे शेतकऱ्यांना सांगितले.

 

याप्रसंगी विदर्भ प्रमुख प्रतीक्षा कुंभारे, अजय आंबटकर, नंदकिशोर भांडेकर, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, डेव्हिड खोब्रागडे, गंगाधर बुटले, प्रगत शेतकरी गजावंत निकोडे, कैलास डोंगरे,बबन निमगडे,विनोद कुळमेथे, सुरेश लाडसे, सचिन तोडसाम, अजय चावके, यांचेसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंगेश भांडेकर यांनी केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!