घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

News34 chandrapur

चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.

 

या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

 

लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे.

 

जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे यांचा समावेश आहे.

 

या सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा आणि न्याय द्यावा यासाठी भूमिपुत्रांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. भूमिपुत्रांच्या वरील मागण्यांवर योग्य ती सकारात्मक चर्चा न झाल्यास दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी संघटनेने दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!