Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

News34 chandrapur

चंद्रपूर – दि. २५/०१/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेमुळे राज्य हादरले, अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे हे एक कृरकृत्य होते या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शवित जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्याबाबत निवेदन दिले. Advocate couple murder case

 

आरोपींनी आधी आढाव दाम्पत्याचे अपहरण करीत 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती, पैसे न मिळाल्याने आढाव दाम्पत्याची हत्या करीत त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असता सर्व आरोपीना अटक करण्यात आली. Chandrapur district bar association

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन 30 जानेवारीला अधिवक्ता संघाने निषेध करीत अश्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ कठोर कायदे करण्याची गरज आहे अशी माहिती बार असोसिएशनचे सचिव खडतकर यांनी दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!