नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

News34 chandrapur

घुग्घूस : केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आज घुग्घुस शहरातील सर्व चालकांनी आपले वाहन सोबत घेत सदर कायद्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.

कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला ठाणेदार आसिफ राजा यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 : 30 वाजेपासून जोरदार निदर्शने केली.

यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.

 

केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करवून घेतला यानुसार चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यास चालकाला अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे.

 

चालक पळून गेला असता व दोषी आठळल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा व सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
चालकांच्या मते वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.

 

तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो सात लाख दंड देऊ शकत नाही.
व सात वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

 

सदर आंदोलनात काँग्रेस नेते अनिरुद्ध आवळे, अलीम शेख,विशाल मादर,रफिक शेख,व चालक अनंता बिराडे, श्याम तिरगुटला,राजू आसपवार,संतोष भारती,शंहशह शेख,बालाजी पतंगे,विजय बेहेवार,जावेद शेख,नेतूराग,आरिफ खान,अकबर अली,राजेश श्रीवास,मुस्तुफा साहू,शहनवाज खान,हिफाज खान, सयाराम सर्वां,शाम कोंडागुर्ला,मोहरम अली,बुधराज कश्यप व मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!