VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

 

1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

 

उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

 

ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

 

याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

 

चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

 

नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

 

जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

 

जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

 

पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!