reti taskari : चंद्रपूर :जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सध्या अत्यंत तीव्र आणि सलग कारवाईची मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची होणारी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र सतर्क झाली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारशहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. (हातचलाखी करीत महिलेचे दीड लाखाचे मंगळसूत्र लांबवीले)
reti taskari विरोधात पोलिसांची कारवाई
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला त्यांच्या खास गोपनीय सूत्रांकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. बल्लारशहा पोलीस स्टेशनच्या सीमा क्षेत्रातून गौण खनिजाची अत्यंत अवैधरित्या reti taskari आणि चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची ती माहिती होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ नियोजन करून बल्लारशहा परिसरात दबा धरून छापा टाकला. या छाप्यात रेतीची बेकायदेशीर वाहतूक करताना एक अवाढव्य हायवा ट्रक रंगेहात पकडण्यात आला.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी टाटा सिग्ना (TATA Signa) कंपनीचा हायवा ट्रक, ज्याचा क्रमांक एमएच ३४ सीक्यू ११९० आहे, तो ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये बेदायदेशीरपणे भरलेली सुमारे ९ ब्रास reti taskariआढळून आली. पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ४५ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि ९० हजार रुपये किमतीची ९ ब्रास रेती, असा एकूण ४५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रक चालक गणेश शिवाजी कोरपल्लेवार (वय २५ वर्षे, राहणार नारपठार, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर) याला ताब्यात घेतले आहे. तर या अवैध धंद्यातील मुख्य सूत्रधार आणि गाडीचा मालक गोपीनाथ राठोड (राहणार सारंगापूर, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारशहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) आणि ४९ सह महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाची ही सलग मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.