त्या अपघाताची मनसे महिला सेने ने घेतली गंभीर दखल

News34

बल्लारपूर – बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे, हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहण चालकांनाच नाही तर पायदळ चालतांना सूद्धा मोठी कसरत करावी लागत आहे.

हि जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघातात वाढ होत आहे, रविवार दिनांक 20 ऑगस्टला मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गायींच्या कळपामूळे सरदार पटेल वार्डात दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत, अश्या घटणा वारंवार घडून कुणालाही आपला जीव गमवाव लागू नये यासाठी आपण जातीने आणि गार्भीयाने लक्ष देउन सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त आठ दिवसाचे आत करावा अन्यथा मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन केले जाईल.

या निवेदनावर मुख्याधिकारी वाघ यांनी सांगितले की आम्ही जनावर मालकांना नोटीस दिली आहे आणि कारवाई सुद्धा करू आमची पूर्ण टीम त्या कामात दिवस आणि रात्र एक करीत जनावर जमा करून प्यार फोंडेशन यांना सोपविले आहे.

मागील काही दिवसात पन्नास ते साठ जनावरे आम्ही जमा केले आणि आपल्या निवेदनाची दखल घेत आम्ही यात आणखी गांभीर्याने लक्ष देऊ आणि काही मोठ प्रकरण नाही घडणार असा प्रयत्न करू आणि जर घडणार तर याला सर्वस्वी संबंधीत प्रशासण जबाबदार असेल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

यावेळेस मनसे पदाधिकारी कल्पना पोतर्लावार तालुका अध्यक्ष महीला सेना, किशोर मडगुलवार, जिल्हा सचिव बल्लारपुर विधानसभा, कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, मंगला घडले शहर अध्यक्ष महीला सेना, प्रंशात कलवल, अजय निराल्ला व मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!