भीषण अपघातात 11 प्रवाश्यांचा मृत्यू

News34chandrapur

राजस्थान – लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 21 वर पहाटे 5 वाजता भीषण अपघात घडला, या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.

 

भावनगर वरून मथुरे ला जाणाऱ्या बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र सकाळच्या सुमारास भरतपूर आग्रा मार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन चालकाने बस महामार्गावर थांबवित, दुरुस्ती करीत होते.

 

रस्त्याच्या कडेला बस उभी केल्याने प्रवासी सुद्धा बसच्या बाहेर निघाले मात्र तितक्यात भरधाव असलेल्या ट्रक ने बस ला मागून धडक देत प्रवाश्यांना चिरडले, यामध्ये तब्बल 11 प्रवाश्यांचा मृत्यू झाला.

 

मृतकामध्ये 6 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे, सर्व मृतक हे भावनगर गुजरात मधील रहिवासी होते, 12 च्यावर प्रवासी या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

 

अपघातानंतर इतर वाहन चालकांनी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांना बघून वाहन थांबवित पोलिसांना सूचना दिली काही वेळ महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, माहिती मिळताच 5 पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!