ओबीसी संघटनांची राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज महत्वाची बैठक

News34 chandrapur

चंद्रपूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील 19 दिवसांपासून रविंद्र टोंगे, विजय बलकी व आजपासून प्रेमानंद जोगी हे आमरण उपोषणाला बसले आहे, तब्बल 19 दिवसांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

ओबीसी समाजाच्या विविध मागणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून सदर बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव महाराष्ट्र, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, डॉ. संजय घाटे, पुरुषोत्तम सातपुते, अनिल डहाके, मनीषा बोबडे, बबलू कटरे, सूर्यकांत खनके, अनिल शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

 

मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 29 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता आयोजित या बैठकीत ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांवर काय चर्चा व तोडगा निघणार यावर सर्व ओबीसी संघटनांचे लक्ष लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!