Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मरतोय, प्रशासन कुठंय?

चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मरतोय, प्रशासन कुठंय?

शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 11 वा दिवस

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर –  आर सी सी पी एल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व विविध मागण्यासाठी कोरपना तालुक्यातील परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी दिनांक १६ ऑक्टोबर पासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला दहा दिवस उलटून ही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या अद्याप ही पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तात असंतोषाचे वातावरण असून उपोषणकर्त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.

RCCPL सिमेंट कंपनीकडून लिजं क्षेत्रातील संपूर्ण ७५६.१४ हेक्टर जमीन सरसकट भूसंपादित करावी, प्रकल्पग्रस्तांना प्रती एकर पन्नास लाख रुपये व एक सातबारा एक नोकरी द्यावी , परसोडा गावाच्या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, दलाला मार्फत करण्यात येणारी खरेदी त्वरित थांबवण्यात यावी,

 

परसोडा व कोठोडा बु या दोन्ही ग्रामपंचायतीच्या नव्याने एनओसी घेण्यात याव्या, कंपनी परिसरातील स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, परसोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची कंपनी वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील पायमल्ली करणारे कंपनी अधिकारी व जबाबदार प्रशासन यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतच्या सूचित करण्यात आलेल्या विषयाच कंपनीने काटेकोरपणे पालन करावे या मागण्या कंपनी व प्रशासनाकडे प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहे. या उपोषणाला आतापर्यंत विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular