शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

News34 chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.

 

धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.

 

पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.

 

शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

 

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.

येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!