Ambedkar Jayanti । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार

April 14, 2026 by Prakash Hande

Ambedkar Jayanti 2026 Celebration : चंद्रपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे दिशादर्शक होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कठोर परिश्रमांच्या बळावर समाजातील अन्यायविषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला. त्यांनी दिलेले संविधान आपल्या देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.  (दीक्षाभूमी ते बाबुपेठ, आमदार जोरगेवारांनी शिक्षणासाठी उघडली तिजोरी)

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. तसेच  गांधी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आमदार किशोर जोरगेवार यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारयुवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिरमहामंत्री रविंद्र गुरुनुलेमनोज पालश्याम कनकमसविता दंढारेगटनेते शेखर शेट्टीबलराम डोडाणीविधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरवंदना हातगावकरबहुजन महिला आघाडी अध्यक्षा विमल कातकरअरुण तिखेतुषार सोमनिलेश बेलखेडेनगरसेविका सविता कांबळेअॅड. सारिका संदुरकरआशा देशमुखशीतल गुरुनुलेपुष्पा उराडेसरला कुळसंगेनगरसेवक भालचंद्र दाणवजितेश कुळमेथेरॉबिन बिश्वास, नितेश गवळीआशिष मासिरकरस्वप्निल डुकरेसायली येरणेराकेश नाकाडेराशिद हुसेननकुल वासमवारवंदना तिखेचंद्रशेखर देशमुखप्रमोद शास्त्रकारसुधीर कारंगलअॅड. परमहंस यादवराकेश बोमनवाररीना साखरकरलक्ष्मी पांडेछाया चावरेआमेश आयलू आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीनागपूरनंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. या पवित्र दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प आपण केला आहे. यासाठी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी दूर करून या विकासकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आपण शहरातील बुद्ध विहारांमध्ये निधी उपलब्ध करून दिला असूनया निधीतून १३ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात परिवर्तन घडवून आणता येतेही त्यांची शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांची अधिक गरज आहे. सामाजिक समताबंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे. 135th Ambedkar Jayanti Celebration

 

बाबासाहेबांचे जीवन हे संघर्ष आणि यश यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन जगाला आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यात मोठी उद्दिष्टे साध्य करावी. बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलअसे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

+