Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ - काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपुरातील या शिक्षकांचा होणार सन्मान
ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels
३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.
इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
Leave a Comment