Rajasthan company job fraud in Chandrapur : चंद्रपूर, महाराष्ट्र - चंद्रपूर शहर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राजस्थानस्थित कंपन्यांनी तरुणांना फसवे आश्वासन देऊन त्यांचे पैसे हडपले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने (मनसे) प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, जेणेकरून पीडित तरुणांना न्याय मिळू शकेल. unemployed youth cheated by companies
केंद्र सरकारने केली जनतेची फसवणूक - खासदार प्रतिभा धानोरकर
गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, मराठा चौकात ट्रेंडस्टिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या राजस्थानच्या कंपनीने तरुणांना लक्ष्य केले. कंपनीने बेरोजगारांना नोकरीची हमी देऊन आणि कपड्यांच्या मार्केटिंगमधून लाखो रुपये कमावण्याचे स्वप्न दाखवले. प्रत्येक तरुणाकडून रु. ११,००० ते रु. ४६,००० पर्यंतची रक्कम घेऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे कपड्यांचे ड्रेस दिले जात होते, ज्याची त्यांना मार्केटिंग करायची होती.
या कंपनीच्या राजस्थानमधील संचालकांनी आपला गाशा गुंडाळल्यानंतर, पैशाची आवक बघता काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्याच ठिकाणी डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी सुरू केली. या कंपनीने पुन्हा गरीब बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली लुटणे सुरू ठेवले. वणी येथील तीन मुली आणि एका मुलाचा ही या कंपनीकडून फसवणूक झाली असून, त्यांनी मनसे कार्यालयात संपर्क साधून आपली व्यथा मांडली आहे. youth fraud through marketing job offers
कंपनीने असे आश्वासन दिले होते की जेवढे कपडे विकले जातील किंवा जेवढे लोक कंपनीसोबत जोडले जातील, त्या प्रमाणात कमिशन मिळेल. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यांमधून आलेल्या तरुणांना चंद्रपूरमध्ये आधीच मोठी कपड्यांची दुकाने असताना, बाहेरच्या प्रांतातून आलेल्या कंपनीचे कपडे कोण घेणार, हा प्रश्न होता. यामुळे अनेक तरुण अर्ध्यातूनच काम सोडून आपल्या गावी परतले. दुर्दैवाने, त्यांचे प्रत्येकी रु. ११,००० ते रु. ४६,००० कंपनीने बुडवले आहेत.

कंपनीमध्ये पैसे भरण्यासाठी काही तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडिलांकडून पैसे घेतले. कुणी स्वतःचे मंगळसूत्र विकून पैसे दिले, तर कुणी मुलींसाठी स्वतःची दुचाकी विकून पैसे दिले. आज हे सर्व पैसे कंपनीने बुडवले असल्याने अनेक तरुण बेरोजगारांवर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी गंभीर परिस्थिती आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रतिक्रिया दिली की, "पीडित तरुण-तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत." यावेळी फसवणुकीचे बळी ठरलेले अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते. मनसेने या प्रकरणात लक्ष घालून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार थांबतील आणि पीडितांना त्यांचे बुडवलेले पैसे परत मिळतील.
हा प्रकार बेरोजगारांच्या असुरक्षिततेचा आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाढत्या कारभाराचा एक नमुना आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Leave a Comment