चाऱ्याची पौष्टीकता वाढवण्यासाठी युरियाची प्रक्रिया फायदेशीर

News34 गुरू गुरनुले

मुल – चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शीच्या विदयार्थीनींनी रविवार ६ ऑगस्ट ला जनावराच्या चाऱ्यावर यूरिया ची प्रक्रिया गावातील शेतकऱ्यांना करून दाखवली आणि त्याचे महत्त्व कळवून दिले.

काही भागात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड असते अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्या वरती रहावे लागते. सध्या चाऱ्याची किंमत सुद्धा जास्ती आहे त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरीया प्रक्रिया महत्त्वाची आहे.

युरीया प्रक्रियेच्या वेळी कुरुड येथील विनोद मडावी, राकेश मुरकुटे, दिपक भांडेकर, विलास सातपुते, देवराव सातपुते हे शेतकरी उपस्थित होते. हा उपक्रम माननीय प्राचार्य डॉ. आदित्य कदम, सहा. प्रा. छबील दुधबळे -सहा. प्रा. तुळशीदास बारसकर, सहा प्रा. श्रीकांत सरदारे, सहा प्रा. पवन बुधबावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.

यावेळी विद्यार्थीनी वैष्णवी बुध्देवार, वैभवी पोफळी , गौरी चौधरी, श्रुतीका लोहकरे आणि तृप्ती घटे उपस्थित होते.

फायदे

१) चाऱ्याची गुणवत्ता वाढवते
२)युरीया व गुळाची प्रक्रिया केल्यास चाऱ्याचा सकसपणा व पचनियता वाढवता येते
३) जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ होते.
4) जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!