बल्लारपुरात हत्येचा थरार

News34 chandrapur

बल्लारपूर – बल्लारपूरमध्ये, केवळ 1500 रुपयांची एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक युवक गंभीर जखमी झाला.

 

6 नोव्हेम्बरला रात्री साडेदहा च्या सुमारास विद्यानगर वार्ड पंचशील चौकात दोन महिलांमध्ये आपापसात उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहाराबाबत वाद सुरू होता, त्यानंतर बचावासाठी गेलेल्या 2 युवकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलांनी युवकांवर हल्ला केला, लाठी काठ्यांनी दोन्ही युवकांवर वार करण्यात आला, या हल्ल्यात 32 वर्षीय ललित उर्फ नागेश रमेश तोडसाम चा जागीच मृत्यू झाला तर 24 वर्षीय अमोल देवगडे हा गंभीर जखमी झाला.

20 वर्षीय शीतल ऋतिक गवई व आकांक्षा नामक महिलेकडून 1500 रुपये उधार घेतले होते, मात्र शीतल ते पैसे परत करीत नव्हती, सोमवारी रात्री आकांक्षा चा भाऊ चैतन्य पंचशील चौकातून जात असताना त्याला शीतल गवई भेटली त्यावेळी त्याने माझ्या बहिणीचे पैसे तू का देत नाही अशी विचारणा केली असता शीतल चा पती रितिक ने चैतन्य ला शिवीगाळी केली, त्याचवेळी ललित व अमोल त्याठिकाणी आले असता त्यांनी रितीक ला समजावले असता दोघात धक्काबुक्की झाली.

 

परिसरातील नागरिकांनी सुरू असलेला वाद सोडविला, त्यानंतर रितीक घरी गेला त्याने घडलेला प्रसंग आई आशा गवई यांना सांगितला असता त्यांनी आपल्या सोबत सौराब खान यांना घेत माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून अमोल व ललित वर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशा गवई यांच्या सोबत असलेले रितीक गवई, शीतल गवई, सौराब खान, बंडू नगराळे यांनी सुद्धा अमोल व ललित वर काठी व दगडाने वार केला, यामध्ये ललित चा जागीच मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी झाला, सध्या अमोल वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

बल्लारपूर पोलिसांनी तोडसाम हत्या प्रकरणात 5 आरोपीना अटक केली आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!