अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात प्रत्यक्ष मोका चौकशी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांना सोबत घेऊन करण्यात यावे. यात धान पीक तूर कापूस पीक याचा प्रामुख्याने समावेश करावा अधिकाधिक धान पीक उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला जास्त बसला आहे.

 

आता धान पीक कापणी केले असून आलेल्या पाण्याने धा सरदड्या जमिनीला चीपकुन गेल्या आहेत. अजूनही कापणी होताच आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे, धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पीकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

 

त्यामुळे धान कापूस तूर इतर पिके कडधान्य पीक नुकसानच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मोका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने. सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात मान. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार यांचे मार्फत आज दि.२८/१२/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. आपला मुल तालुका हा केवळ एका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुबाला साभाळणे अडचणीचे झाले आहे. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न कसे करावे.

 

पहिलेच कर्ज बाजारी असताना पुन्हा कुठून कर्ज घ्यावे या विवंचनेत सापडले आहेत. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतक-याना नुकसान लवकारत लवकर भरपाई मिळवून दयावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्ष २०२४ चा पीक विमा काढला असून कंपनीने विम्याचे पैसे जमा केले आहे. तेव्हा विमा कंपनीला शासनाने आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकरी यांचे त्वरित पाहणी व पंचनामे करून तात्काळ तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुका काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

 

निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती व संचालक घनश्याम येणुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, आ.भा.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, संचालक संदीप कारमवार, मनोज ठाकरे, युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कवार, सदस्या समता बंसोड, अन्वर शेख, नंदकिशोर मडावी, औद्योगिक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, सुशी सरपंच अनिल सोनुले , संचालक हसन वाढई, मनोज, यांचेसह कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

काँग्रेसने निवेदन देताच शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश

मुल तालुका कांग्रेस शेतकऱ्यांच्या अवकाळी आकस्मिक पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व विमाचे पैसेही त्वरित मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना, तहसीलदार यांचे मार्फतिने निवेदन देताच महाराष्ट्र शासनाने लगेच अवेळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश क्र.सी एल एस-२०२३/प्रं. क्र.२६०/म.३ दिनांक २८/११/२०२३ अन्वये तात्काळ आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!