चंद्रपूर: विकसित महाराष्ट्रात जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, पालकमंत्री वुईके

May 01, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचेउद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्रघडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरीशेतमजूरआदिवासीदलितवंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकासहाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहीलअशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

 

पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकरखासदार प्रतिभा धानोरकरआमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतक-यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांना सुध्दा सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2011 पुर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून नागरिकांना जागेचा / घराचा मालकी हक्क देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

Viksit Maharashtra Chandrapur: 2 लाख कर्जमाफी, 11 PHC मानांकन

राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. निपुन भारत अभियानांतर्गत सुपर स्कूल घटकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर 4 उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. सिकलसेल निर्मुलन मोहीम अंतर्गत रुग्णांची चाचणी करून उपचार करण्यात येत आहे. टी.बी. मुक्त पंचायत अंतर्गत जिल्ह्यातील 345 ग्राम पंचायती टी. मुक्त करण्यात आल्या आहेत. पी.एम. किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 45 हजार 471 पात्र शेतक-यांना एकूण 148 कोटींचे वितरण करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. तसेच 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात स्वयंगणनेचा शुभारंभ होत असून नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले.

 

नागरिकांना पट्टे वाटप व सन्मान : यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने मंदा टेकाममारुती येरणेमिरा नायडूमिराबाई उराडेशेहनाज जाकर अली यांना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त ॲङ क्षमा बारसकरनिता पंतॲङ भाग्यश्री फाटक यांचामाझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिबगाव (ता.सावली)चिखली (ता. सावली)दुर्गापूर (ता. चंद्रपूर)भेजगाव (ता. मुल) या ग्रामपंचायतींचाग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता प्रदीप बाराहातेग्राम महसूल अधिकारी नंदा हेपटगुणवंत खेळाडू अश्विनी निमजेहरमनसिंग मारबापंकज बेले यांचा पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह प्राप्त झालेले पोलिस निरीक्षक शिवाजी कदमपोलिस उपनिरीक्षक विलास निकोडेसुनील गौरकर आणि पोलिस हवालदार संदीप उपरे यांचा शालश्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

+