Sunday, September 24, 2023
Homeचंद्रपूरमॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार - नाना...

मॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे मूल येथे जंगी स्वागत

- Advertisement -
- Advertisement -

News34 गुरू गुरनुले

मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले.

 

काँग्रेसच्या वतीने काढण्यात येत असलेल्या जनसंवाद याञेनिमित्य जिल्ह्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले काल चंद्रपूर येथुन गडचिरोली कडे जात असताना राञो ९.४५ वा. दरम्यान त्यांचे स्थानिक गांधी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. आ. पटोले यांच्या आगमना निमित्य काँग्रेस भवन येथे मार्गदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे संघटक नाना गावंडे, वडसा येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी उपस्थित होते.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तालुका काँग्रेसच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रावत मित्र परिवार सहका-यांच्या वतीने आ. नाना पटोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आल्यानंतर संतोषसिंह रावत यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना बोलुन दाखवतांना आपले पायगुण चांगले असल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याने पाऊस मिळाला. असे म्हणत नानाभाऊच्या नेतृत्वात पक्षकार्याची प्रशंसा केली.

Chandrapur rular congress
नाना पटोले यांचा मूल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करताना

क्षेञात भाजपाचा आमदार आणि मंञी असतांना तालुक्यात काँग्रेस आघाडीवर आहे. परंतु सत्ता नसल्याने प्रशासनाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. अशी खंत व्यक्त करतांना भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याला नेतृत्वाची संधी द्यावी. अशी आग्रही विनंती संतोषसिंह रावत यांनी बोलुन दाखविली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या भारत जोडो याञेचे अनुकरण करत आपण जनसंवाद याञेचे नियोजन केले असल्याचे सांगतांना याञेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेतल्यास राज्यात यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे सांगितले.

 

सध्याची स्थिती काँग्रेस करीता अनुकुल असुन मत आणि मनभेद दुर ठेवुन काम करा. संधी न गमवता संधीचे सोने करा, अन्यथा आपल्या सारखे कपाळ करंटे लोक नाही. हे लक्षात घेवुन कामाला लागा. असे आवाहन केले.

 

शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि गुरू चौधरी यांनी आभार मानले. यावेळी कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, सोसायटी अध्यक्ष संदीप कारंमवार, सरपंचं संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, युवक अध्यक्ष पवन निलवार, संचालक किशोर घडसे, राहुल मुरकुटे,हसन वाढई, योगेश शेरकी, दिपक वाढई, दशरथ वाकुडकर,जालिंदर बांगरे,भगवान ढोरे,बंडू गुरनुले, शांताराम कामडे, कैलाश चलाख, प्रशांत उराडे, रुपाल रावत, लिना फुलझेले, केदारनाथ कोटगले, संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, छोटू रावत, शामला बेलसरे, राधिका बुक्कावार,समता बंसोड, आर. टी.गुरनुले, भाऊजी लेनगुरे, यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी तालुका युवक आणि महीला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..